
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विद्युत खांबाच्या तुटलेल्या ताराच्या स्पर्शाने गेला शेतकऱ्याचा प्राण.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
मुख्य संपादक
संतोष मेश्राम
दि. 17/10/ 2023 .
सावली तालुक्यातील जाम रयतवारी येथील शेतकरी प्रकाश महादेव कोहोळे अंदाजे वय ४५ वर्षे, आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आपल्या शेतीची पाहणी करण्यासाठी शेतात गेले असता विद्युत खांबाच्या तुटून पडून असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने विद्युत धक्का लागुन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सदर शेतकरी हा नेहमीप्रमाणे सकाळी उठून शेत पाहणी करण्याकरीता शेताकडे गेले परंतु बराच काळ लोटुनही घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध करत शेताकडे धाव काडली असता शेतकरी प्रकाश कोहोळे हे मृत्त अवस्थेत आढळून आले.
सदर हि घटना महवितरणच्या भोंगळ कारभारामुळे घडल्याची लोकांत चर्चा आहे तसेच महावितरणने वेळोवेळी विद्युत खांबावर आलेल्या झाडाची छाटणी केली असती, तर आज या शेतकऱ्याचा जीव गमवावा लागला नसता ,अशा या महावितरणच्या अल्गर्जीपणामुळे व महावितरणच्या चुकीमुळे घरचा कर्ता जीव गेल्याने या कुटुंबियाची खुप मोठी हानी झालेली आहे. तसेच महावितरणने मृतक इसमाच्या कुटुंबीयाना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यात यावी व सदर दुर्लक्षित करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या घटनेने परिवारात व गावात शोककळा पसरली आहे.