5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द , केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द , केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 26/12/24.
मुंबई,
शिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेंशन पॉलिसी संपुष्टात आणली आहे. त्यामुळे आता पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुतीर्ण करण्यात येणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांच्या आत पुन्हा परीक्षा देता येणार आहे. मात्र पुन्हा अनुतीर्ण झाल्यास या विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश मिळणार नाही. तसेच कुठल्याही शाळेला इयत्ता आठवीपर्यंतच्या कुठल्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकता येणार नाही.